Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत आहेत

 

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीकडून अचानकपणे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु
  • राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे
  • कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल
मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यातील लढतीमुळे राज्यसभेची निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, आता शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीकडून अचानकपणे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई आणि सतेज पाटील हे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. अगदी कालपर्यंत शिवसेनेकडून (Shivsena) कोणत्याही परिस्थितीत सहाव्या जागेवर आमचाच उमेदवार निवडून येणार, असा दावा छातीठोकपणे केला जात होता. मात्र, कालपासून राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. (Rajyasabha Election 2022)

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यानुसार महाविकास आघाडीचे मंत्री शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. मात्र, राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत आहेत. त्यापूर्वी मविआ नेत्यांचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटणार का, हे पाहावे लागेल. तसेच देवेंद्र फडणवीस मविआच्या विनंतीला मान देऊन धनंजय महाडिक यांना माघार घ्यायला लावणार का, हेदेखील पाहावे लागेल.
११ छोटे पक्ष, १६ आमदार; पण फडणवीसांचा खेळ ११ आमदार बिघडवणार?
या सगळ्याच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीसमोर कोणता प्रस्ताव ठेवतात का, हेदेखील पहावे लागेल. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत चार जागांवर भाजपचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, भाजप पाचव्या जागेवरही उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येण्यात अडचण निर्माण होईल. भाजपने राज्यसभा निवडणुकीत माघार घेतल्यास विधान परिषदेतील पाचव्या जागेवर भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून यावा, असे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आज फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काही चर्चा होते का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajyasabha election 2022 mahaviaks aghadi may meet devendra fadnavis to take back nomination of dhananjay mahadik
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here