सुमित वर्मा यांनी म्हटलं आहे की, पडळकर यांना अचानक राजमातांनी केलेले कार्य आठवले. राजमाता अहिल्यादेवींचे कार्य धर्मासाठी मोठे आहेत, त्यांना आम्ही वंदनच करतो. पण नगरकरांची अंबिकादेवीवरील श्रद्धा, आस्थाही लक्षात घ्यायला हवी. अहिल्यानगर या नावाची मागणी करताना आपण रिमोट कंट्रोलवर चालणारे आहात की स्वाभिमानी आहात? असा प्रश्न पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मात्र, यापेक्षा मला हे विचारायचे आहे की मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या नावाची म्हणजे अहमदनगरचे अंबिकानगर या नावाची घोषणा केली होती. ती जबाबदारी पुढे घेऊन जाणार आहात की कुणाच्या मर्जीतील नावच रेटणार आहात? हेही आम्हाला पाहायचे आहे. १९९५ मध्ये वाडियापार्क या ठिकाणी झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे अंबिकानगर नाव केल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आमच्या मनात हेच नाव आहे, असंही वर्मा म्हणले.
Home Maharashtra gopichand padalkar: अहमदनगरच्या नामांतर वादात आता मनसेचीही उडी; पडळकरांवर टीका करत नवी...
gopichand padalkar: अहमदनगरच्या नामांतर वादात आता मनसेचीही उडी; पडळकरांवर टीका करत नवी मागणी – bjp gopichand padalkar vs mns raj thackeray over ahilyanagar name issue
अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदगनरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असं करावं ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर नगरमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘अंबिकानगर’ या नावाची याआधीच मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या घोषणेची आठवण करून दिली आहे. १९९५ मध्ये वाडिया पार्क येथे झालेल्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनीच अहमदनगरचे नाव अंबिकानगर केल्याची घोषणा केली होती, याची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी करून दिली आहे.