बारा वर्षानंतर या मालिकेतील कलाकारांची नुकतीच पुनर्भेट म्हणजेच रियुनियन झालं आहे. या रियुनियनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘ आठतोय का आम्ही…??? असंभव रियुनियन ते देखील तब्बल बारा वर्षांनी… हे सगळं घडवून आणल्याबद्दल शर्वरी पाटणकर तुझे आभार. खूप हसलो. शूटिंगचे किस्स, गंमती आठवल्या…असं उर्मिलानं म्हटलं आहे.
‘असंभव’ या मालिकेनं एक काळ गाजवला होता. सतीश राजवाडे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. चिन्मय मांडलेकरनं या मालिकेचे लेखन केलं होतं.
कलाकारण कोण होते?
या मालिकेत दिग्गज कलाकारांची मोठी फौज होती. मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे, मधुराणी प्रभुलकर, या कलाकारांच्या असंभव मालिकेत प्रमुख भूमिका होत्या