नवी दिल्ली: विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क सक्तीनं लागू करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. मुख्य न्यायाधीश विपिन सांघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं महत्त्वाचा आदेश दिला आहे. विमानतळं आणि विमानांमध्ये मास्क न लावणाऱ्यांकडून दंड आकारण्यात यायला हवा. नियम कठोरपणे लागू व्हायला हवेत, असंही न्यायालयानं म्हटलं. केवळ जेवणाच्या वेळीच प्रवाशांना मास्क हचवण्याची सूट देण्यात आल्याचं डीजीसीएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

विमानतळांवर आणि विमानांमध्ये विमान कर्मचाऱ्यांनी मास्क घालायला हवेत. हात स्वच्छ ठेवायला हवेत. कर्मचारी नियमांचं पालन करतात की नाही ते पाहण्याची जबाबदारी डीजीसीएची आहे. विमान प्रवासादरम्यान नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवायला हवा. त्यांचा समावेश नॉन फ्लाय यादीत करायला हवा, असं न्यायमूर्ती म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. लस घेतली नसल्यास ती घ्यायला हवी. नियमांचं पालन करायला हवं. लोकांना लॉकडाऊन नको असेल, तर या गोष्टी कटाक्षानं करायला हव्यात, असं आवाहन ठाकरेंनी केलं.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४ हजार ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ३ महिन्यांत पहिल्यांदाच देशात एका दिवसात ४ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांत १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर २ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले.

mohan bhagwat on gyanvapi masjid

मशिदीच्या वादावर सरसंघचालक मोहन भागवतांनी हिंदुत्ववाद्यांना सुनावलं

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here