पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
तुम्ही माझी चिंता करू नका, मला सगळे विचारतात, तुमचं काय भविष्य आहे, उद्या काय होणार आहे, तुम्हाला काय मिळणार आहे, याची मला खरंच चिंता नाही, याची मला अजिबात चिंता नाही, दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, माझ्या पराभवाचंही मला सोनं करता आलं, याच्या एवढं पुण्याई कुणाकडे आहे, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, हा पराभव मला शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या सरळ स्वभावाच्या सात्विक मोठ्या नेत्यापर्यंत घेऊन गेला, हा पराभव मला खूप काही शिकवून गेला, तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मंचावरील कोणी आपलं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकत नाही, तुम्ही आहात जे एखाद्याचं भविष्य घडवू किंवा बिघडवू शकतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा :
पंकजा मुंडे झाल्या वाढपी, गोपीनाथ गडावर भाविकांना आग्रहाचं जेवण
आता जे सरकारमध्ये चाललंय, जे टीव्हीवर पाहायला मिळतंय, त्याविषयी मनामध्ये मला विषाद वाटतो. जात, धर्म व्यक्तीगत हेवे दावे, याच्यापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करण्यासाठी आणि देशात मुंडे साहेबांसारखं नाव करण्यासाठी तुमचे आशीर्वाद लाभू द्यात, अशी मागणीही पंकजांनी केली.
शिवराजसिंह चौहान यांचं कौतुक
ज्यांच्या नावातच शिवराज आहे, ज्यांच्यावर शिवचा आशीर्वाद आणि जनतेच्या मनावर राज्य, या दोघांचाही सहभाग आहे, त्यांचं मी गोपीनाथ गडावर स्वागत करते. आपलं जे नातं आहे ते माझ्यामुळे नाही तर गोपीनाथ मुंडेंमुळे आहे. इथेच तुम्ही मुंडेंच्या अंत्यसंस्काराला आला होतात, जिथे तुम्ही त्यांचे अंतिम दर्शन घेतले, आज तिथेच कमळाच्या फुलावर त्यांची समाधी आहे, या समाधीचं नाव गोपीनाथ गड आहे, असं पंकजा म्हणाल्या.
हेही वाचा : पंकजाताई म्हणतात, माझे कार्यकर्ते ‘सोबर’; धनंजय मुंडेचे कार्यकर्ते ‘दबंग’
तुम्ही मध्यप्रदेशात जी कमाल केली, ती देशात कुठल्याही राज्यात झाली नाही, तुम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचं काम केलं, त्यासाठी आम्ही तुम्हाला सन्मानित करतो. आम्ही तुमचे स्वागत हे प्रेम आणि प्रार्थनेने केलं, त्याचा स्वीकार करा. तुमच्यासारखे लोक जेव्हा या गडावर येतात तेव्हा मला माझ्या वडिलांचा अनुभव येतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा :
‘अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर…’; काकांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक
आज मला त्या दिवसाची आठवण येते, आज मुंडे साहेबांचं ८ वं पुण्यस्मरण आहे. मोदींच्या सरकारलाही ८ वर्ष पूर्ण झाली आहेत, मोदींच्या सरकारमध्ये मुंडेंचा चेहरा पाहणारे लोक मुंडेंचा सत्कारही करू शकले नाही, इथेच त्यांच्या सत्काराची सभा होणार होती. पण, आम्हाला अंत्यसंस्कार करावे लागले. मुंडेंची जागा कोण घेणार, त्या लोकांना एकत्र करण्यासाठी गोपीनाथ गड मी तयार केला. हे माझ्यासाठी नाही, तर हे या लोकांसाठी आहे. या लोकांना माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही, यांना फक्त एका व्यक्तीला पाहायचं आहे, जो मुंडेंविषयी प्रेम मनात ठेवतो आणि गरिब, वंचितांचं काम करतो. पुण्यस्मरणाच्या दिवशी गंभीर दिसणाऱ्या पंकजा आज का हसताय, पंकजा काय बोलणार याची वाट मीडिया पाहात आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.