बुलडाणा : अखिल भारतीय काँग्रेसच्या उदयपूर येथील नवसंकल्प चिंतन शिबिरातील घोषणापत्राच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी राजीनामा दिला. शुक्रवारी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्तेही नव्या सूत्राचे पालन करीत राजीनामे देणार असल्याची माहिती आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ‘एकापेक्षा अधिक पद असलेल्या पदाधिकाऱ्यांना, एक व्यक्ती एक पद व एक व्यक्ती पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर राहणार नाही,’ हे सूत्र पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या नव्या सूत्रानुसार राज्यातील दोन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. २ जून रोजी शिर्डीतील प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोंद्रे हे दोनदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांहून अधिक झाला होता. त्यांच्या समर्थनात स्थानिक पदाधिकारीदेखील राजीनामा देणार असल्याची कुजबुज आहे.

Mumbai Monsoon 2022 : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? पावसाचं स्वरुप कसं असेल ?
गत दहा वर्षांपासून हर्षवर्धन सपकाळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. उदयपूर शिबिरातील घोषणा पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपाध्यक्षपदाचा आपला राजीनामा पक्षाकडे गत आठवड्यात सादर केला. ऑगस्ट २०१३मध्ये मणिशंकर अय्यर यांच्याकडील राजीव गांधी पंचायत राज संघटनेचा कार्यभार तत्कालीन खासदार मीनाक्षी नटराजन तथा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. २०१४मध्ये सपकाळ विधानसभेत पोहोचल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते. सुरुवातीची अडीच वर्षे गुजरातपाठोपाठ मध्य प्रदेशची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. या कार्यात व्यस्त असल्याने बराच काळ त्यांना प्रभारी राज्यामध्ये व राजीव गांधी पंचायत राज संघटनेस देणे भाग पडले होते. याचा राजकीय फटका २०१९च्या निवडणुकीत त्यांना बसला होता. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या पश्चात एक वर्षाने २०२०मध्ये सचिवपदावरून कार्यमुक्त करीत संपूर्ण वेळ राजीव गांधी पंचायत राज संघटनेत काम करण्याच्या सूचना पक्षपातळीवर त्यांना मिळाल्या होत्या. पुढे सव्वा दोन वर्षांनी मात्र पंजाबच्या बिघडलेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुनश्च अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव नियुक्त करण्यात आले होते.

शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीत पारदर्शकता येणार, शहरी-निमशहरी भागांसाठी चांगली बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here