Nitin Gadkari | पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते.

 

Nitin Gadkari Sharad Pawar
नितीन गडकरी आणि शरद पवार

हायलाइट्स:

  • नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले
  • हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही
सोलापूर: महाविकास आघाडीवर नाराज होऊन सरकारमधून बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असतानाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना केंद्र सरकारमध्ये राहून जे साध्य झाले, ती गोष्ट शरद पवार (Sharad Pawar) यांना का जमली नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. मात्र, हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही. हा ही प्रश्नच आहे. गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच. मात्र, शरद पवार हे कृषीमंत्री होते. साखर कारखानदारांचे मंत्री होते. त्यांना ही गोष्ट का जमली नाही, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘मी म्हटलं, कुसुम काय चाललंय? तिचा चेहरा फुलला’, पवारांनी कोणता किस्सा सांगितला?
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. शरद पवार हे साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असे शरद पवार म्हणतात. अठरा-वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार शरद पवार यांच्याकडून केला जात नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
आघाडी स्थापन झाल्याचे शिवसेनाप्रमुखांना आवडले असते का? ; शरद पवारांनी दिले उत्तर
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते. आगामी काळात फ्लेक्स फ्युएल इंजिनांमुळे पेट्रोल-डिझेलऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरुन वाहने चालवणे शक्य होईल. देशात सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे धोरण आहे. हे प्रमाण आगामी काळात वाढल्यास इथेनॉल निर्मितीमधून साखर कारखानदारांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. यामुळे कारखान्यात आलेल्या सर्वच ऊस साखरनिर्मितीसाठी वापरला जाणार नाही. त्यामुळे साखरेचे उत्पादनही आटोक्यात राहील आणि साखरेचे भाव हे स्थिर राहतील, असे गडकरी यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : raju shetty praises nitin gadkari slams ncp chief sharad pawar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here