औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या पाणीप्रश्नावर राजकारण तापलं आहे. तोच आता आम आदमी पार्टीदेखील औरंगाबाद मनपाच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत केली.

दिल्ली आणि पंजाबमध्ये आलेल्या यशानंतर आता आपने आपला मोर्चा महाराष्ट्रकडे वळवला आहे. महाराष्ट्रातीलही सर्व निवडणुका आम आदमी पक्ष लढविणार असल्याचे माहिती देखील पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी लढविणार आहे.

मुंबईत २ महिला, ४ अल्पवयीन मुलांनी मिळून पुरुषाला काठ्यांनी मारलं, मृत्यूनंतर धक्कादायक कारण समोर…
निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराला पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल येणार असल्याची माहिती यावेळी दिली. पक्षाची पुर्ण तयारी झाली असून सर्व कार्यकर्ते निवडणुकीसाठी तयार असल्याची माहिती माहाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी दिली आहे.

मुंबईत करोनाची आकडेवारी वाढली, जूनच्या ४ दिवसांत मार्चच्या तुलनेत दुप्पट प्रकरणं समोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here