मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील एका न्यायालयाने रमी खेळण्याशी संबंधित एका प्रकरणात नऊ व्यावसायिकांना दोषी ठरवलं आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये मुंबई न्यायालयाने नऊ व्यावसायिकांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, पोलिसांनी खोलीतील आरोपींकडून ३.२५ लाख रुपये जप्त केले होते.

एसीपी वसंत ढोबळे हे २०१५ मध्ये निवृत्त झाले होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरातील पब आणि रेस्टॉरंट्सवर रात्री उशिरा छापे टाकून बातम्या दिल्या होत्या. या प्रकरणातदेखील त्यांनी माहिती मिळताच खोलीवर छापा टाकला होता.

दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे खरं आहे की फार कमी बाबी खटल्याच्या बाजूने निष्कर्षापर्यंत पोहोचतात. आरोपींनी जुगार खेळण्याच्या उद्देशाने पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. २०११ मध्ये आरोपीच्या सांगण्यावरून मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, २००० रुपयांच्या दंडासह ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा पुरेशी होईल, असे माझे मत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, ७-८ जूनला ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
या प्रकरणात, असा आरोप आहे की २७ ऑगस्ट २०११ रोजी, मध्यरात्री नंतर, आरोपी अश्विन भन्साळी आणि संदीप चाळके हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरील खोलीत थांबले होते. तर दोषी आढळलेले इतर सात जणही यात सहभागी म्हणून उपस्थित होते असाही आरोप करण्यात आला.

आरोपींच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र, पोलिसांनी केवळ आरोपपत्र दाखल केले असून हॉटेल व्यवस्थापकाचे जबाब नोंदवलेले नाहीत. कोणतेही स्वतंत्र साक्षीदार नव्हते, असे बचाव पक्षाने सांगितलं आहे.

न्यायालयाने नमूद केल्यानुसार, खटल्यातील सर्वोत्तम साक्षीदार बहुधा एसीपी किशोर नथ्थू घरटे, छापा टाकणाऱ्या पक्षाचे प्रभारी अधिकारी होते, जे ढोबळे यांच्यासह अन्य दोन एसीपींसोबत घटनास्थळी गेले होते. छापा घालणाऱ्या पक्षात एसीपी स्तरावरील तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता.

देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here