अयोध्या: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आंदोलनाशी आमचा कोणताही संबंध नाही. बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचे स्वत:चे असे नेतृत्त्व आहे, ते पैलवान आहेत, कोणाच्या दबावाखाली येऊन काम करणारे नाहीत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यात खोडा घालण्यासाठी आम्ही त्यांच्याशी ‘डील’ करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही त्यांच्याशी अशी ‘डील’ का करू? राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी काय डील झाली होती हा प्रश्न तुम्ही आम्हाला नव्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना विचारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि वरुण सरदेसाई हे तिघेजण शिवसेना कार्यकर्त्यांसह सोमवारी अयोध्येत दाखल झाले. यावेळी संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. मात्र, यावेळी पत्रकारांनी आदित्य यांच्या दौऱ्यापेक्षा बृजभूषण सिंह, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक आणि उत्तर भारतीयांबाबत शिवसेनेची भूमिका या मुद्द्यांवरूनच संजय राऊत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
‘पाच लाखांची गर्दी जमवण्याचा दावा, पण बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला फक्त २५०० लोक’
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना विरोध केला होता. त्याविरोधातील उत्तर भारतीयांच्या मनातील आक्रोश बृजभूषण सिंह यांच्या आंदोलनाच्यानिमित्ताने समोर आला, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर पत्रकारांनी राऊत यांना विचारले की, उत्तर भारतीयांबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे? तेव्हा संजय राऊत यांनी त्यांच्या पाठिशी बसलेल्या शिवसेना नेत्याकडे हात दाखवला. हे आमचे मीरा-भाईंदरमधील नगरसेवक उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील आहेत. एवढेच काय आमचे मुंबईतील बहुतांश पदाधिकारी हे उत्तर भारतीय आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘पाच लाखांची गर्दी जमवण्याचा दावा, पण बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला फक्त २५०० लोक’

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतरही बृजभूषण सिंह आपल्या भूमिकेवर ठाम होते. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी आयोजित केलेले त्यांचे सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पार पडले होते. यामध्ये रविवारी झालेल्या शरयू स्नानाचाही समावेश होता. या कार्यक्रमाला ५ लाख लोक जमतील, अशी भीमगर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात या कार्यक्रमाला २००० ते २५०० लोकांचीच गर्दी जमल्याची माहिती पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here