Rajyasabha Election 2022 | अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून सोमवारी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीचा अभिप्राय मागितला. तेव्हा ईडीने अभिप्राय देण्यासाठी वेळ मागून घेतली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. त्यावेळी ईडी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला जाण्यासाठी परवानगी देणार का, हे पाहावे लागेल.

 

Nawab Malik Anil Deshmukh
नवाब मलिक आणि अनिल देशमुख

हायलाइट्स:

  • येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे
  • पाच जागांवर संबंधित पक्षांचे उमेदवार सहजपणे निवडून येतील
  • सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे
मुंबई: राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेवरून कोण निवडून येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या जागेवरची लढत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या निवडणुकीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुरु असलेली चढाओढ पाहता या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, महाविकास आघाडीचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन्ही मंत्री सध्या तुरुंगात असल्याने ही दोन मते कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडीची अडचण वाढू शकते. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिका यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला परवानगी मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. (Rajyasabha Election 2022)

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून सोमवारी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. या अर्जावर सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीचा अभिप्राय मागितला. तेव्हा ईडीने अभिप्राय देण्यासाठी वेळ मागून घेतली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे. त्यावेळी ईडी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला जाण्यासाठी परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या अधिकाराचे भवितव्य आता ईडीच्या भूमिकेवर अवलंबून आहे, असे म्हणावे लागेल.
Rajyasabha Election 2022: अन्यथा आम्ही शेवटच्या ५ मिनिटांत निर्णय घेऊ; बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा
येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी पाच जागांवर संबंधित पक्षांचे उमेदवार सहजपणे निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाईल. जेणेकरून भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावणे शक्य होणार नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : anil deshmukh and nawab malik sought premission for voting in rajyasabha election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here