वर्धा : मित्राचा वाढदिवस साजरा करून रात्रीच्या सुमारास घराकडे निघालेल्या २३ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अक्षय मनोज सोनटक्के (२३, रा. संत तुकाराम वॉर्ड रामनगर) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तीन दुचाकींवर आलेल्या आठ आरोपींनी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या क्षुल्लक वादानंतर ही हत्या केल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास गोरसभंडार कॉलनीजवळील रस्त्यावर घडली.

या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील पाच जण अल्पवयीन आहे. अल्पवयीन पाच आरोपींसह ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि निलेश मनोहर पटेल यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मुख्य आरोपी मयूर गिरी याचा पोलीस शोध घेत आहे.

वसंत मोरेंच्या खंद्या शिलेदाराचा पक्षाला रामराम, पुणे मनसेला पुन्हा हादरा

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल तामगाडगे (रा. हिंदनगर) याचा वाढदिवस असल्याने अक्षय सोनटक्के आणि त्याचे काही मित्र हे दुचाकीने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील मैदानात केक कापण्यासाठी गेले होते. अमोलने केक कापला असता सर्व मित्र त्याला केक भरवत होते. दरम्यान मृतक अक्षय हा मैदानाबाहेर निघाला आणि दुचाकीने घरी जात असतानाच तुकडोजी मैदानाकडून आलेल्या तीन दुचाक्या थांबल्या आणि दुचाकीला कट का मारला, असं म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करण्यात आली. तेवढ्यात मुख्य आरोपी मयूर गिरी याने अक्षयच्या पोटात चाकू भोसकला. ही बाब वाढदिवस साजरा करणाऱ्या अक्षयच्या मित्रांना समजताच त्यांनी धाव घेत अक्षयला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

शिवसेनेच्या ‘त्या’ ७ आमदारांवर मुंबईच्या नेत्यांचा ‘वॉच’!; चर्चेला उधाण

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पंचनामा करून प्रत्यक्षदर्षी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले तर ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि निलेश मनोहर पटेल यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मयूर गिरी याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here