मुंबई: ‘वादळ येणार, वणवा पेटणार’, असं म्हणत मनोरंजनविश्वात ‘रानबाजार’ नावाचं एक नवं वादळ आलं. दोन फुलपाखरांच्या फडफडण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या वादळाची चर्चा त्याच वेगाने सर्वदूर पसरली. हे वादळं नक्की काय असेल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेली सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?!’ असं एक प्रश्नार्थक विधान असलेलं एक पोस्टर काही दिवासांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. अभिजीत पानसे लिखित-दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजची चर्चा अवघ्या मनोरंजनविश्वात रंगत होती. वेब सीरिजचे प्रोमो आणि ट्रेलर पाहिल्यानंतर ही वेब सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक झाले होते. अखेर ही बोल्ड सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.

रानबाजारच्या टिझरमध्ये तेजस्विनी विवस्त्र होताना दाखवण्यात झाली आहे.तर प्राजक्ता प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. बोल्ड टिझरमुळं तेजस्विनीलाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण तेजस्विनीनं तिच्या शब्दांत ट्रोलर्सला उत्तरही दिलं आहे. तेजस्विनीनं नुकतीच शेअर केलेली एक पोस्टही सध्या चर्चेत आली आहे.

काय आहे तेजस्विनीची पोस्ट?
ऐकून छान वाटतयं !तुम्हाला आयेशा ची कहाणी आवडतेय….बघितली का ‘रानबाजार’ ?असं तेजस्विनीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पती पत्नी और वो !अमिताभ बच्चन यांच्या घरातच घडला तो सीन, किस्सा आजही आहे चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित यांच्या भूमिकांबरोबरच या वेब सीरिजला तगडी स्टारकास्ट लाभली आहे. डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, उर्मिला कानेटकर-कोठारे, अनंत जोग, सुरेखा कुडची, वैभव मांगले, निलेश दिवेकर, गिरीश दातार, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे कलाकारही या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. ‘रानबाजार’च्या निमित्तानं वेबविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिजीत पानसे यांनी या थरारपूर्ण वेब सीरिजच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रथमच अभिनेते म्हणूनही त्यांनी मनोरंजनविश्वात यानिमित्तानं पदार्पण केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here