आमशा पाडवी हे सेनेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केल्याचं बोललं जातं. अक्कलकुवा हा अत्यंत दुर्गम भाग असून कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी या भागात शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे.त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र राज्याच्या राजकारण दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. सी. पाडवी यांना त्यांनी कडवी झुंज दिली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी ८० हजार ७७७ मते घेतली होती.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या काळापासून नंदुरबारमधून काँग्रेसच्या राज्यातील निवडणूक प्रचाराला सुरुवात होते. त्यामुळे या जिल्ह्यात पाय रोवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाडवी यांना शिवसेनेने विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.
‘भाजपचा घोडेबाजार रोखायचाय, म्हणून खबरदारी