सर्वच उद्योगांमध्ये राजीनाम्याचा ट्रेंड दिसेल. विविध वयोगटातील कर्मचारी राजीनामे देतील. याचं प्रमाण कमी होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये कंपन्यांतील अनेक चांगले कर्मचारी नोकऱ्या सोडतील. करोना काळानंतर कंपन्यांचं धोरण बदललं आहे. नव्या धोरणांमुळे नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. यापैकी ११ टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर अनेकजण राजीनाम्याच्या विचारात आहेत.
करिअरमधील प्रगती, पगारवाढ, पदोन्नती या कारणांमुळे कर्मचारी राजीनामा देतील. कामाच्या ठिकाणी उत्तम वातावरण देणाऱ्या कंपन्यांना कर्मचारी प्राधान्य देतील, असं मायकल पेजचा अहवाल सांगतो. बोनस आणि प्रोत्साहन पुरस्कारांमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास अधिक हुरूप येतो, असंदेखील अहवालात नमूद करण्यात आलं.
कामाचे वातावरण