मुंबई: हिंदी-मराठी चित्रपटांतून विविध लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अतुल सध्या वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सीरिजमधील त्यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडतायत. त्याचं कौतुकही होतंय.

इतकंच नव्हे तर आमिरच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटासाठी अतुल यांनी पटकथा लेखनाचं काम पाहिलं आहे. असं असलं तरी अतुल यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार चर्चा झाल्या नाहीत. अतुल यांची पत्नी देखील सिनेसृष्टीत कार्यरत असून त्या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
‘बेरोजगार’ अक्ष्या आहे तरी कोण? पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं,अन्…
‘आर्या २’ , गुल्लक अशा हिंदी वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी या अतुल यांच्या पत्नी आहेत. प्रयोगशील आणि प्रगल्भ अभिनेत्री अशी गीतांजली कुलकर्णी यांची ओळख आहे. त्यांनी ‘गुल्लक’ या वेब सीरिज मध्ये साकारलेल्या शांती मिश्रा या पात्राची सध्या चर्चा आहे.

पहिली भेट
१९९३ साली एनएसडी (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा)मध्ये अतुल आणि गीतांजली यांची पहिली भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघांनी लग्न केलं.
इमर्जन्सी कमिशनवर लष्करात रुजू झाले अन्… वाचा अच्युत पोतदार यांच्याबद्दल माहित नसेलल्या गोष्टी
तू आणि पती अभिनेते अतुल कुलकर्णी यांची कामावरुन चर्चा होते का? असा प्रश्न गीतांजली यांना विचारला असता, स्वत:ची आणि इतरांची कामं बघून चर्चा होते, अगदी वादही होतात. त्यातही एक वेगळी मजा असते, असं त्या म्हणाल्या.

गीतांजली यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर, एका हिंदी चित्रपटात मुख्य भूमिकेत त्या दिसणार आहेत. ‘रंगबाज’चा तिसरा सीझन येतोय. भाडिपाची एक हिंदी सीरिज येणार आहे, त्यातही त्यांनी काम केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here