uddhav thackeray aurangabad rally | संभाजी महाराजांच्या नावाला सार्थ असं शहर बनवेन त्यावेळी मी शहराचं नाव बदलेनं. संभाजी राजांच्या नावाला साजेसं शहर बनवेन. मात्र, पाणी नाही, रस्त्यात खड्डे आहेत, अशा वेळी शहराला नाव देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी औरंगाबच्या सभेत सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथील विराट सभेत शिवसैनिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली, या भाजपच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला.

 

बाबरीच्या मुद्द्यावर भाजप आमदारालाच पुढे करून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाच खिंडीत गाठलं
बाबरीच्या मुद्द्यावर भाजप आमदारालाच पुढे करून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाच खिंडीत गाठलं

हायलाइट्स:

  • औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते
  • मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत
  • सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते
औरंगाबाद: बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता, असा छातीठोक दावा करणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्धव ठाकरे यांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. ते बुधवारी औरंगाबाद येथील सभेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक डाव शिताफीने त्यांच्यावरच उलटवला. (CM Uddhav Thackeray aurangabad rally)
बाबरी आम्ही पाडली तुम्ही भोंग्यांनाही घाबरता, फडणवीस यांचा ठाकरे सरकारला टोला
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे आता सांगत आहेत की, बाबरी पतनावेळी मी अयोध्येत गेलो होतो. तिकडे एकही शिवसैनिक नव्हता. पण औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते. मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत. आता मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव तुमच्याकडे (भाजप) येऊन आमदार झाले आहेत. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आमदार झाले आहेत. तेव्हा सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते. सावे ज्या फडणवीसांची पालखी वाहत आहेत त्यांच्यासमोर खरं-खोटं करावं. मोरेश्वर सावे त्यावेळी अयोध्येला गेले नसतील तर त्यांच्या चिरंजीवांनी सरळ सांगून टाकावे की, माझे बाबा अयोध्येला गेले नव्हते. हा मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे या दोघांनाही चांगलेच पेचात पकडले आहे. त्यामुळे आता यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार, ते पाहावे लागेल.
‘बाबरी पाडताना माझं वजन १२८ किलो होतं, आज १०२ किलो आहे, लाजायचं काय त्यात’ : फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथील विराट सभेत शिवसैनिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली, या भाजपच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला हिंदुत्व मोजण्याची फुटपट्टी कोणी दिली? एवढंच जर वाटत असेल तर एकदा खुल्या मंचावर सामना होऊन जाऊ द्या. मग हिंदुत्वासाठी शिवसेनेने काय केलं आणि भाजपने काय केलं, हे स्पष्ट होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena supremo uddhav thackeray slams bjp devendra fadnavis over babri masjid and hindutva issue
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here