औरंगाबाद : मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘स्वाभिमान’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत संजय राऊतांनी राज ठाकरे आणि भाजपला टोला लगावला आहे. ‘काहीजण औरंगाबादमध्ये आले आणि गेले, पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ‘औरंगाबामध्ये उसळळेली लाट ही दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही’, असंही ते यावेळी म्हणाले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वाभिमान’ सभेमध्ये ते बोलत होते.

सत्ता गेल्याने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला

दरम्यान, ‘सत्ता गेल्याने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पाण्यासाठी तो मोर्चा नव्हता. आमच्या आधी त्यांची सत्ता होती, त्यांनी का निधी दिला नाही’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. संभाजीनगरच्या रस्त्यांसाठी निधी देत आहोत. गेल्या अडीच वर्षांपासून काम करत आहोत. औरंगाबादमध्ये मेट्रोची गरज लागली तर त्याचा प्लॅन बनवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शहराचं विद्रुपीकरण करणारी मेट्रो नसेल तसेचं संभाजीनगरची शान वाढवणाऱ्या गोष्टी करु’, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
संभाजीनगर कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत ठाकरी भाषेत सांगितलं…!
मेट्रो रेल्वेचा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील

‘मेट्रो रेल्वेचा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून त्याचा आराखडा बनवण्याचं काम महापालिकेनं सुरू केल्याची माहितीही सुभाष देसाई यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका मोठ्या कंपनीने औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत’, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

६० किमी पायपीट, ६ कोटी वेळा रामनाम लिहिलं; कट्टर शिवसैनिकासमोर मुख्यमंत्री आदराने झुकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here