भंडारा : भंडाऱ्यामध्ये बारावी निकाल लागल्यानंतर पास झालेल्या तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रासोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावी पास झाल्यानंतर सेलिब्रेशन करणं तरुणाला महागात पडलं. कारण मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वैनगंगा नदीत पात्रात बुड़ून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी रेल्वे पुलाखाली घडली. निखिल महादेव बालगोटे वय १७ वर्ष असं मृतकाचं नाव आहे.

Pre Monsoon Rain Update : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ जिल्ह्यांना झोडपलं
बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये निखिलला ५७ टक्के गुण मिळाले होते. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी निखिल निकाल लागल्याच्याच दिवशी तीन मित्रांसह माडगी येथील वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला. नदी दिसताच पाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. दरम्यान, निखिलचा तोल जाऊन तो नदी पात्रात बुडाला.

यावेळी त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केलं. मात्र, तोपर्यंत निखिलचा मृतदेह वाहून गेला. घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतक निखिल याचा नदीपात्रात शोध सुरु केला असता सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय इथं पाठविण्यात आला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे. १२ वीच्या परीक्षेत पास झालेला निखिल मात्र दुर्देवाने जीवनाच्या परिक्षेत नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मैत्रीच्या नावाला काळीमा; हॉटेलमध्ये जेवल्यानंतर दोघांनी केला तरुणाचा निर्घृण खून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here