मुंबई: राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा ३१००वर पोहोचला आहे. आतापर्यंत ३०० लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आजाराला घाबरायचं कारण नाही, असं आरोग्यमंत्री यांनी सांगितलं. राज्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवत आहोत. आणखी वाढवायचं असून, एकूण ३६ लॅब आपण उपलब्ध करून देतोय, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत राज्यात १९४ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचा दर अधिक आहे. ८३ टक्के मृतांना दुर्धर आजार होते. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मृत्यू झाले आहेत, त्यांचे ऑडिट होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times