कोल्हापूर : जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील सवजियानमध्ये १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडीमधील अवघ्या २० वर्षीय ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. त्याच ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांना ग्रामसेवक त्रास देत असल्याचा संतपाजनक प्रकार समोर आला आहे.

ग्रामसेवकाच्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी

शहीद ऋषीकेश यांच्या कुटुंबीयांनी ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना शहीद ऋषीकेश यांचे वडील रामचंद्र हरी जोंधळे तसेच आई कविता रामचंद्र जोंधळे यांनी पत्र लिहून ग्रामसेवक डवरींपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्राची प्रत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनाही पाठवली आहे.

तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा! फडणवीसांकडून भाजप आमदारांना महत्त्वाची सूचना
‘तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते’

‘तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगितले होते’. ज्या तिरंग्यातून मुलाचे पार्थिव आले तो तिरंगा सुद्धा बळजबरीने काढायला लावल्याचा आरोप वीर माता पित्यांनी केला आहे. गावामध्ये बदनामीकारक बॅनर उभे करून कुटुबांची बदनामी केल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ग्रामसेवक डवरी हे गेल्या अनेक वर्षांपासून जोंधळे परिवाराला त्रास देत असून देशसेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबाला असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही संघटना करत आहेत.

संगमनेरात वादळी पावसाचा हाहाकार! चौघांचा बळी, मृतांमध्ये १० वर्षीय मुलाचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here