Rajyasabha Election 2022 | राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असेल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरु असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- आज राजेशाही नाही, लोकशाही आहे
- या लोकशाहीत तुम्ही राजे आहात
- लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या
यावेळी उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. आज राजेशाही नाही, लोकशाही आहे. या लोकशाहीत तुम्ही राजे आहात. मात्र, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या. पक्षबिक्ष आपण मानत नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी थोडा विचार करायला पाहिजे. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरु असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले.
खऱ्या कुस्त्या तर मातीतल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक स्कीम आहेत. या माध्यमातून कुस्तीपटू आणि खेळाडुंना नक्की फायदा करुन देईन. मगाशी माझा उल्लेख कोणीतरी ट्रिपल केसरी म्हणून केला, त्यांच्या मनात काय होतं हे मला माहिती नाही. पण माझं वय काय एवढं झालेलं नाही, ट्रिपल करण्यासारखं, असे उदयनराजे यांनी म्हटले. याच कार्यक्रमात उदयनराजे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. कोण संजय राऊत त्यांना मी ओळखत नाही. यापुढे राजघराण्यावर बोलाल तर, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा उदयनराजे यांनी संजय राऊत यांना दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp mp udyanraje bhosale reaction on rajyasabha election 2022 and vidhanparishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network