Rajyasabha Election 2022 | जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले नसल्याने आता दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ दुपारी ४ वाजता संपत आहे.

 

Nawab Malik
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

हायलाइट्स:

  • दुपारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला
  • जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या
  • दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी दोघांकडून न्यायालयात अर्जही करण्यात आले होते. मात्र, कायदेशीर पेचांमुळे या दोघांनाही राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. (Rajyasabha Election 2022)

नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला. पण जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले नसल्याने आता दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ दुपारी ४ वाजता संपत आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर सुनावणी होऊन नवाब मलिक यांना मतदानाला जाण्याची परवानगी मिळाली तरी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ते मतदानासाठी वेळेत पोहोचतील का, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या आशा आता जवळपास मावळल्या आहेत.
मतदान करताना घोळ, आव्हाड-यशोमती ठाकूर यांचं मत बाद करण्याची भाजपची मागणी, वाचा काय घडलं?
एवढेच नव्हे तर विशेष पीएमएलए न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नवाब मलिक यांच्या याचिकेबाबत आणखी एक आक्षेप उपस्थित केला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला असेल तर तो आदेश रद्द करण्याची विनंती करणारी याचिका तुम्हाला करावी लागेल. पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवू देण्याच्या परवानगीचा आदेश देण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे?”, असा प्रश्न न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नवाब मलिक यांच्या वकिलांना विचारला. त्यामुळे आता पुन्हा सुनावणी झाल्यास न्यायालायकडून हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp leader nawab malik plea in pmla court for rajyasabha election 2022 voting
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here