नवी दिल्ली: राज्यसभेच्या सहाव्या जागेचा पेच कायम आहे. मतदान पूर्ण होऊन तीन तास उलटले तरीही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांचं मतदान रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे. भाजपनं थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणी रखडली आहे.

२०१७ मध्ये गुजरातमध्ये राज्यसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळीही असंच नाट्य रंगलं होतं. तीन जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. सत्ताधारी भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार विजयी होणं नक्की होतं. मात्र निवडणुकीआधी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे भाजपचे चाणक्य असलेल्या अमित शाहांनी तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला. शाहांच्या खेळीमुळे काँग्रेसचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांची जागा धोक्यात आली.

विजयासाठी ४५ मतं गरजेची होती. काँग्रेसच्या २ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. त्यामुळे या आमदारांचं निलंबन करण्याची मागणी काँग्रेसनं केली. काँग्रेसच्या २ आमदारांनी भाजपला मतदान करत बॅलेट पेपर दाखवल्याचा आरोप होता. काँग्रेसनं आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणी रोखली.
राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, केंद्रीय निवडणूक आयोगाची एन्ट्री, मतमोजणी थांबवली!
काँग्रेसची मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली. दोन आमदारांची मतं अवैध ठरली. याचा फायदा अहमद पटेल यांना झाला. अवघ्या अर्ध्या मतानं त्यांनी ही निवडणूक जिंकली. पटेल यांचा पराभव करण्यासाठी शाहांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मध्यरात्रीपर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर पटेल यांनी बाजी मारली.
तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि कोलगेट; महाविकास आघाडीकडून चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचं हटके गिफ्ट
भाजप, काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा मतमोजणी थांबवली. निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. भाजपचे रविशंकर प्रसाद, अरुण जेटली हे कायदेपंडित नेते आयोगाकडे पक्षाची बाजू मांडत होते. तर काँग्रेसची कायदेशीर बाजू रणदीप सुरजेवाला, कपिल सिब्बल यांना लावून धरली. पटेल यांच्या विजयात त्यांनीही मोलाची भूमिका बजावली. या निवडणुकीत भाजपकडून अमित शाह आणि स्मृती इराणी विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here