अमरावती : राज्यात एकीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय खळबळ सुरू असताना दुसरीकडे हनुमान चालीसावरून मोठं राजकारण तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा चंग बांधला आणि राज्यभरात रान उठलं. मात्र, रवी राणा यांनाच हनुमान चालीसा पाठ नसल्याने ते सध्या नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी बनले आहेत.
मात्र, काही काळानंतर आमदार रवी राणा यांना ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.