Vidhanparishad Election 2022 | धान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेतही अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्षांना साद घालणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला.

 

हायलाइट्स:

  • शिवसेना आपले दोन उमेदवार निवडून आणेल
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांना निवडून येण्यासाठी एक-दोन मतं कमी पडत आहेत
  • दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचं गणित कसं जुळवायचं हे तेच ठरवतील
अयोध्या: राज्यसभा निवडणुकीत रंगलेल्या हायव्होल्टेज राजकीय सामन्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीतही भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच दहाव्या जागेवर उभा असलेला काँग्रेसचा (Congress) उमेदवार पडणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने भाई जगताप (Bhai Jagtap) यांना निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे, असे सांगत हात झटकले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नव्या वक्तव्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या भाई जगताप यांचा पराभव होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (Vidhanparishad Election 2022)
‘राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मुंबईतून निवडणूक आयोगाला सूचना दिल्या जात होत्या’
संजय राऊत यांनी गुरुवारी अयोध्येत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विधानपरिषद निवडणुकीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना आपले दोन उमेदवार निवडून आणेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांना निवडून येण्यासाठी एक-दोन मतं कमी पडत आहेत, पण ते निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार नक्की निवडून येईल. पण एकासाठी संघर्ष करावा लागेल. आता दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचं गणित कसं जुळवायचं हे तेच ठरवतील, अशी त्रयस्थ भूमिका संजय राऊत यांनी घेतली. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसकडे एका उमेदवाराला निवडून आणण्याइतपतच मतं आहेत. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मतांची बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे.
उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, देवेंद्र फडणवीसांना शह देण्यासाठी वर्षावरील बैठकीत प्लॅन आखणार
राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेतही अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्षांना साद घालणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी आणि सरकारचे नेते आहेत. दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार कसा निवडून आणायचा याबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे राऊत यांनी सांगितले. राऊतांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता दहाव्या जागेवरील काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना विशेष कष्ट घेणार नाही, असे संकेत मिळत आहेत. शिवसेना काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी, ‘आमच्याकडे मतंच नाहीत’, असे सांगत अक्षरश: हात झटकले. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य धोक्यात असल्याच्या चर्चेने आता जोर धरला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader sanjay raut on vidhanparishad election 2022 congress candidate may face defeat
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here