मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान महामार्गावरील जंक्शन असलेल्या भरणे नाका इथे आधी भुयारी मार्ग प्रस्तावित होता. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोल खड्डाही खणण्यात आला होता. मात्र, अचानक येथील भुयारी मार्ग रद्द करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. भरणे नाका जंक्शनवर असणारी वाहतूक, तसेच या ठिकाणी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेत उड्डाण पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करणे गरजेचे होते.
अशात कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीकडून गेली तीन वर्षे उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे भरणे नाका येथील जंक्शनवर नेहमीच वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. पुलाचे काम सुरू झाल्यावर आंबवली विभागातील सुमारे १५ गावांकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने या भागात जाणाऱ्या प्रवाशांना वळसा मारून प्रवास करावा लागत होता.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times