पहिल्यांदा असं होणार आहे की, माझ्या मनातील गोष्ट सांगतानाही मला दोन वेळा विचार करावा लागतोय. मी माझी बाजू मांडण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या मुलाखतीतील एक छोटा भाग व्हायरल झाला. पण त्याच्या आधी आणि नंतर मी काय म्हणाले होते, हे कोणी पाहिलं नाही. मला विचारण्यात आलं होतं की तू कोणाला पाठिंबा देते? यावर मी तटस्थ असल्याचं सांगितलं होतं.
मला माझं बालपण आठवतंय. शाळेत असताना आपण सर्व प्रतिज्ञा म्हणायचो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तेव्हा कधीही जात,धर्मावरून आम्हाला विभागलं गेलं नव्हतं. त्यामुळं मी जेव्हा काही बोलते ते निष्पक्ष होऊन बोलते.
काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर मला या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत बोलायची संधी मिळाली. हा चित्रपट पाहून मी खूप अस्वस्थ झाले होते. यामुळं अनेक पिढ्यांनी सोसलेल्या वेदनांना मी कमी लेखू शकत नाही. त्यानंतर मी मॉब लिंचिंगबद्दल नाही बोलू शकत. मला वाटतं की कोणतीही हिंसा ही चुकीचीच असते. आणि धर्माच्या नावावर केली जाणारी हिंसा तर मोठं पाप आहे. अनेक लोक मॉब लिंचिंगचं समर्थन करतात, पण प्रत्येकाच्या आयुष्याचं मोल आहे.
मला वाईट वाटलं की, माझं वक्तव्य चुकीच्या प्रकारे घेण्यात आलं. पण गेल्या काही दिवसांत माझ्यासोबत जे उभे राहिले, मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी आभार मानते, असं साई पल्लवी म्हणाली.
वाचा काय म्हणाली होती, साई पल्लवी?