मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा काय असते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाले. या निवडणुकीत पाचव्या जागेवरून प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा कठीण परिस्थितीत पुन्हा एकदा आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) भाजपच्या मदतीला धावून आले आहेत. मुक्ता टिळक यांनी पुण्यातून निघताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुक्ता टिळक यांच्या बोलतानाही धाप लागत होती. मात्र, अशा अवस्थेमध्येही मुक्ता टिळक या पुण्याहून मुंबई असा प्रवास करत विधानभवनात जाऊन मतदान करणार आहेत. (Vidhanparisahd Election 2022)

विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग अशावेळी भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणे, हे आमच्या रक्तामध्येच भिनलं आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली. मुक्ता टिळक यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या पक्षावर किती निष्ठा असावी, हे मुक्ता टिळक यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election LIVE: विधानपरिषद निवडणूक २०२२

मुक्ता टिळक या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. राज्यसभा निवडणुकी वेळीही मुक्ता टिळक या मुंबईला मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचा विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता. तर, खासदार अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी देखील आपला विजय मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला होता.
Vidhanparishad Election 2022: पक्षाने आम्हाला ‘तो’ पर्याय दिला होता; लक्ष्मण जगतापांच्या भावाचं शिवसेनेला प्रत्युत्तर
‘सामना’तून भाजपवर टीका

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाही. त्याचवेळी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीस मतदानासाठी उचलून आणले जात आहे. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून मतांसाठी आणले जात आहे. विजयाची आणि चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here