भाजपकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांचे ४ उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजप आणि मित्रपक्ष यांच्याकडे एकूण ११३ मतं आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी २७ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपचे पाचवे उमेदवार असलेल्या प्रसाद लाड यांचा विजय अवघड मानला जात आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ भाजपकडे नाही. राज्यसभा निवडणुकीत भाजपला १२३ मतं मिळाली होती. आताही तितकीच मतं मिळाली, तरीही लाड विजयी होऊ शकणार नाहीत.
राज्यसभेवेळी फडणवीसांची यशस्वी रणनीती
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी मतांचं उत्तम नियोजन केलं होते. त्यावेळी एका उमेदवाराला विजयासाठी ४२ मतांची गरज होती. तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी भाजपकडे पुरेशी मतं नव्हती. मात्र तरीही भाजपनं पहिल्या दोन उमेदवारांना प्रत्येकी ४८ आमदारांचा कोटा दिला. इतक्या आमदारांचा कोटा देऊनही फडणवीसांनी महाडिक यांना निवडून आणलं. अपक्ष आणि लहान पक्षांमुळे हे शक्य झालं.
आता फडणवीसांची रणनीती काय?
राज्यसभेवेळी खुलं मतदान होतं. आपण कोणाला मतदान केलं आहे, ते आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवायचं होतं. मात्र विधान परिषदेवेळी गुप्त मतदान आहे. त्यामुळे भाजपच्या पाचव्या उमेदवाराची मदार ही पूर्णपणे अपक्ष आणि लहान पक्षांवर आहे. याशिवाय मविआच्या काही मतं फुटतात का याकडेही फडणवीसांचं लक्ष आहे. तसं झाल्यास फडणवीसांचा मविआला हा दुसरा धक्का असेल.
mlc election: तर आणि तरच लाड होणार आमदार; पाचव्या जागेसाठी फडणवीसांचा कस लागणार, रणनीती ठरली – vidhan parishad election bjp totally depends on independent mlas small parties and cross voting for fifth seat
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दीडशेहून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. यातील सर्वाधिक आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. दहाव्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. दोन्ही पक्षांकडून अपक्ष आणि लहान पक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.