शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीचे ६ उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपला हवा करायची सवय असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

 

Bhaskar Jadhav Shivsena
<p>भास्कर जाधव </p>

हायलाइट्स:

  • विधानपरिषदेसाठी मतदान सुरु
  • मविआला ६ जागांवर विजय मिळणार भास्कर जाधवांचा दावा
  • मविआ आणि भाजप आमने सामने
मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मतदान प्रक्रिया संपत आल्याचं म्हटलं आहे. शिवसेना गटा गटानं मतदान करत आहे ही गोष्ट खरी आहे. गेल्या वेळी काही उणिवा राहिल्या त्यामुळं भाजपचं फावलं आणि त्यांचा निवडून न येणारा उमेदवार निवडून आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत. विधानपरिषदेसाठी मतदानाचा कोटा सांगण्यापेक्षा चार तास राहिले आहेत. मतमोजणीत मतांचा कोटा किती आहे ते कळेल,असं भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव काय म्हणाले?
विधानपरिषदेसाठी सर्व मतदान तासाभरात झालेलं असेल. आता आम्ही विधानपरिषदेसाठी काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आलं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. भाजपचा पोकळ आत्मविश्वास आहे. बाहेर संभ्रम निर्माण करायचा, वातावरण निर्माण करायचा, हवा निर्माण करायची भाजपची कार्यपद्धती आहे. चार तासानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे स्पष्ट होईल, असं भास्कर जाधव म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shivsena leader bhaskar jadhav slam bjp and said mva will won six seats in maharashtra vidhan parishad election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here