विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. पोलिसी वॉरंट असलेले रवी राणा विधिमंडळात पोहोचले आहेत. शाईफेक प्रकरणात त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आलं असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

 

ravi rana reaches assembly to cast his vote
<p>आमदार रवी राणा</p>

हायलाइट्स:

  • विधिमंडळात विधान परिषदेसाठी मतदान सुरू
  • आमदार रवी राणा मतदानास पोहोचले
  • रवी राणा यांच्या निशाण्यावर शिवसेना
मुंबई: अमरावतीचे आमदार रवी राणांविरोधात दोनच दिवसांपूर्वी अटक वॉरंट जारी करण्यात आलं. अमरावतीचे पोलीस वॉरंट घेऊन राणा यांच्या मुंबईतील घरी पोहोचले. मात्र त्यावेळी राणा घरी नव्हते. यानंतर आज रवी राणा विधानभवनात मतदानासाठी पोहोचले. भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. पोलिसांचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मी घरात नसताना अमरावती पोलीस मुंबईत वॉरंट घेऊन आले. त्यांना मुंबईच्या पोलिसांनी सहकार्य केलं. माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, मला रोखण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. मी महाविकास आघाडीला, शिवसेनेला मतदान करावं यासाठी दबावाचं राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. त्यांच्या विजयासाठी एकनाथ शिंदेंनी बरीच मेहनत घेतली होती. मात्र तरीही त्यांचा पराभव झाला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर आणि तरच लाड होणार आमदार; पाचव्या जागेसाठी फडणवीसांचा कस लागणार, रणनीती ठरली
रवी राणा आमच्या पायाशी येतील, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मात्र तसं कधीच होणार नाही. मतदारांनी मोठ्या विश्वासानं शिवसेनेला निवडून दिलं. मात्र शिवसेनेनं लोकांची दिशाभूल केली. ५६ वर्षांत प्रथमच लोकांचा विश्वासघात केला. बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कायम विरोध केला. संपूर्ण आयुष्यभर ते त्यांच्याशी लढले. मात्र उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायाशी गेले. त्यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीका राणा यांनी केली.
फडणवीसांनी आमदार फोडला?; राज्यसभेवेळी मविआसोबत असलेला आमदार आता भाजपच्या गटात
भाजपचे सगळे उमेदवार निवडून येतील; राणांना विश्वास
माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. मला अटक होऊ शकत असल्यानं मी २ दिवस मुंबईबाहेर होतो. आज मी मतदानासाठी विधिमंडळात आलो आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही मी हनुमान चालिसा घेऊन मतदानाला जाणार आहे. बजरंगबलीच्या कृपेनं आणि फडणवीसांच्या रणनीतीनं भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : vidhan parishad election ravi rana reaches assembly to cast his vote
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here