असं उघडकीस आलं प्रकरण…
शेतातील आखाड्यावर अहिल्याबाई एकट्याच होत्या. आज सोमवारी सकाळी काही शेतकऱ्यांना अहिल्याबाई यांचा मृतदेह आखाड्याजवळ आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार चाटसे, प्रशांत शिंदे, वाखारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांचा सुरू आहे तपास…
अहिल्याबाई यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील आखाडा वरील शेतकऱ्यांचा जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तर शांताबाई यांच्या माहितीनंतर नेमके खुनाचे काय कारण आहे याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचा शोध सुरू केला असून त्याच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शेतीच्या कारणावरुन हा खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.