घरातच मुलांना इंग्रजी शिकवली जाते. हाऊ आर यू, सॉरी असं आपणच बोलत असू तर ते आपल्याकडून हेच शिकणार आहेत. शाळेत कोणती भाषा शिकवली जाणार हे नंतरच, पण घरी कोणती भाषा आपण बोलतो,ते महत्त्वाचं असतं. भाषा टिकण्यासंदर्भात आपण सरकारला बोल लावतो, पण आपणही यासाठी पुढाकार घ्यायला’, असं अरुण नलावडे म्हणाले.
अरुण नलावडे यांच्या कामबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ते या मालिकेत देशपांडे सरांची भूमिका साकारत आहेत.
मालिकांच्या टीआरपीवर बोलताना नलावडे म्हणाले होते की, टीआरपी म्हणजे काय हेच इतक्या वर्षांत मला कधी कळलं नाही. मी त्यात पडतही नाही. मी करत असलेली एक मालिका याच कारणास्तव बंद झाली होती. पण, त्याबद्दलची वाहिन्यांची गणितं वेगळी असतात. ग्रामीण, शहरी प्रेक्षक असं वर्गीकरण केलं जातं. विशिष्ट भागांत विशिष्ट मालिका बघण्याची कारणं वेगळी असतात. असे सगळे निकष लावले जातात. त्यामुळे कोणतीही वाहिनी या सगळ्याचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करते. पण, टीआरपीमुळे दर्जात्मक मालिका चिरडली जाऊ नये इतकीच माफक अपेक्षा आहे. हल्ली अनेक सीरिजमधून जे दाखवलं जातं ते बघून असं वाटू लागलंय की समाजात चांगलं, पवित्र असं काही आहे की नाही?