औरंगाबादेत एका व्यक्तीने चक्क तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा लिहून आपल्या पत्नीला पोस्टाने तलाकनामा पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा दिला नाही तसचं घरात राहण्याची लायकी नसल्याचे सांगून, वडिलांकडून २ लाख रूपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात येत होता. या छळानंतर विवाहित महिला माहेरी आली होती. त्यानंतर विवाहितेच्या पतीने लेखी पोस्टाने तलाकनामा पाठवून तिहेरी तलाक दिला आहे.

हायलाइट्स:
- पतीने पोस्टाने पाठवला पत्नीला तलाकनामा
- औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
- आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा दिला नाही तसचं घरात राहण्याची लायकी नसल्याचे सांगून, वडिलांकडून २ लाख रूपये घेऊन ये, अशी मागणी करून विवाहितेचा छळ करण्यात येत होता. या छळानंतर विवाहित महिला माहेरी आली होती. त्यानंतर विवाहितेच्या पतीने लेखी पोस्टाने तलाकनामा पाठवून तिहेरी तलाक दिला आहे.
याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पती सरफराज सिकंदर यांच्यासह सासरच्या अन्य आठ जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : husband by post sends triple divorce letter to wife aurangabad news
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network