eknath shinde: मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन, भाई म्हणाले, ‘माझी एक मागणी आणि एका प्रश्नाचं उत्तर द्या!’ – uddhav thackeray talks eknath shinde through phonecall 15 minute discussion
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ‘जय महाराष्ट्र साहेब’ म्हणत फोनची सुरुवात झाली. मी कोणता पक्ष काढला नाही, कोणत्याही पक्षाला शब्द दिला नाही, कुणाशी डील केली नाही, मग माझ्याविरोधात मुंबई-ठाण्यात वातावरण का पेटवलं जातंय? या एका प्रश्नाचं साहेब मला उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना म्हणाले, त्यावर तुम्ही काही काळजी करु नका. हे सगळं सुरळीत होईल. तुम्ही अगोदर मुंबईत या, आपण समोरासमोर भेटून बोलू… असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले. यावेळी १० मिनिटांच्या संभाषणात एकनाथ शिंदे यांनी वारंवार भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली.
एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री बंडाची तलवार उपसल्यानंतर शिवसेना नेत्यांचा त्यांच्याशी दुपारी १ वाजता संपर्क झाला. सूरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याची खबर सेना नेत्यांना मिळाली. वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांना फोन लावण्यास सांगितलं. एकनाथ शिंदे यांनीही नार्वेकरांना फोन घेतला, चर्चेची तयारी दर्शवली. त्यानंतर नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक सूरतच्या दिशेने रवाना झाले. दुपारी ४ वाजता नार्वेकर आणि फाटक सूरतला पोहोचले. मात्र पोलिसांनी २० मिनिटे नार्वेकर आणि फाटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही. अखेर एकनाथ शिंदेंनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर नार्वेकरांना प्रवेश देण्यात आला. शिंदेंच्या जागी बिनचर्चेतील आमदाराला गटनेतेपद, ठाकरेंनी चाव्या स्वतःकडेच ठेवल्या? पुढे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. त्या चर्चेवेळी एकनाथ शिंदे यांची भाजपसोबत सरकार बनवा, हीच प्रमुख मागणी होती. त्यानंतर नार्वेकरांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन केला. एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचायला सुरुवात केली. मी कोणता पक्ष काढला नाही, कोणत्याही पक्षाला शब्द दिला नाही, कुणाशी डील केली नाही, मग माझ्याविरोधात मुंबई-ठाण्यात वातावरण का पेटवलं जातंय? या एका प्रश्नाचं साहेब मला उत्तर द्या. तसेच मला गटनेतेपदावरुन का हटवलं असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर तुम्ही काही काळजी करु नका. हे सगळं सुरळीत होईल. तुम्ही अगोदर मुंबईत या, आपण समोरासमोर भेटून बोलू… असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले.
झाला तितका संसार बस्स झाला! शिंदे समर्थक आमदारांची ‘मन की बात’; मातोश्रीवर दबाव वाढला त्यावर मुख्यमंत्र्यांनीही एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा तुम्ही मुंबईत या, आपण समोरासमोर बसून चर्चा करु, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं ऐकून घेतल्यानंतर साहेब मला आश्वासन हवं आहे, आपण ते आश्वासन द्या, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बातचित केली. एकनाथ शिंदेंचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी अधिक चर्चा करुन निरोप कळवतो, असं नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं.