Shivsena MLA’s with Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील शिवसेनेचे जवळपास सगळेच आमदार फोडले आहेत. औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यातील तर सर्वच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारपैकी तीन आमदारांना गळाला लावण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. तसेच रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधीलही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

 

Eknath Shinde Uddhav Thackeray (1)
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • मातोश्रीवर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीलाही शिवसेनेचे २० पेक्षा जास्त आमदार उपस्थित नव्हते
  • उपस्थित आमदारांमध्ये मुंबई आणि कोकणातील आमदारांचाच भरणा जास्त होता
  • एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचं अस्तित्त्व मुंबई आणि कोकणापुरतंच मर्यादित राहील की काय
मुंबई: ‘शिवसेनेचा ढाण्या वाघ’, ‘फायरब्रँड नेते’, ‘शिवसेनेच्या जुन्या फळीतील खंबीर नेतृत्त्व’ अशा अनेक विशेषणांनी गौरवले जाणारे एकनाथ शिंदे यांनी सध्या आपल्या संघटनेच्या आणि नेत्यांच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे आता शिवसेनाच संपते की काय, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना सोडली होती. मात्र, त्यावेळी मर्यादित नुकसान होण्यापलीकडे शिवसेनेला फार मोठा धक्का बसला नव्हता. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील एक आमदारांचा मोठा गटच फोडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना पक्ष हा संपेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर आपल्यासोबत शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. या दाव्याने शिवसेना नेत्यांची झोप उडवली आहे. कालपासून शिवसेनेचे प्रमुख नेते पक्षाचे बहुतांश आमदार आमच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसोबतचा फोटो प्रसिद्ध करुन शिवसेनेचा हा दावा किती फोल आहे, हे दाखवून दिले आहे.
‘तलवारीस तलवार भिडणार’; एकनाथ शिंदेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर शिवसेनाही आक्रमक भूमिकेत
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील शिवसेनेचे जवळपास सगळेच आमदार फोडले आहेत. औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्यातील तर सर्वच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारपैकी तीन आमदारांना गळाला लावण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. तसेच रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधीलही सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे साहजिकच एवढे सगळे आमदार गेल्यानंतर राज्यात शिवसेनेचं अस्तित्त्व उरेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सेनेचे ४० आमदार सोबत, आणखी १० येणार; एकनाथ शिंदेंचा दावा, शिवसेनेला खिंडार?
मातोश्रीवर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीलाही शिवसेनेचे २० पेक्षा जास्त आमदार उपस्थित नसल्याचे सांगितले जाते. उपस्थित आमदारांमध्ये मुंबई आणि कोकणातील आमदारांचाच भरणा जास्त होता. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचं अस्तित्त्व मुंबई आणि कोकणापुरतंच मर्यादित राहील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि भाजपचा एकूण रेटा पाहता सध्या शिवसेनेच्या बाजूने असलेले आमदारही दुसऱ्या बाजूला जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला आणखी १० आमदार येऊन मिळतील, असा दावा केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना सोबत घेऊन ‘प्रतिशिवसेना’ स्थापन केल्यास खऱ्या शिवसेनेचं अस्तित्व संपेल यामध्ये शंकाच नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm uddhav thackeray shivsena party may finished if eknath shinde go with bjp with 40 mla’s
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here