नारायण राणेंच्या ट्विटनंतर पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल बोललं जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय ? यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. राज्यातील राजकीय नाराजीनाट्यात सध्या सर्वात महत्त्वाचं नाव एकनाथ शिंदे असल्यानं ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आलाय. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य होते. त्यामुळं त्यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही.
गेल्या महिन्यात आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आनंद दिघेंचा मृत्यू अपघाती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या शेवटी मात्र एका सीनमुळं सध्या चर्चेला उधाण आलं आहे.
काय आहे हा सीन?
चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची जवळची माणसं, कार्यकर्ते यांच्या अश्रृंचा बांध फुटल्याचं दाखवण्यात आलं. हे सुरू असतानाच एक व्यक्ती रडणाऱ्या एका कार्यकर्त्याला दिघे कशामुळे गेले? असं विचारताना दाखण्यात आलंय. यावर तो कार्यकर्ता हार्ट अटॅक ने गेले असं सांगतो. यावर तो व्यक्ती कुणी सांगितलं असंही विचारतो? डॉक्टरांनी सांगितल्याचं कार्यकर्ता सांगतो. यानंतर तो व्यक्ती त्या कार्यकर्त्याला तुम्ही रिपोर्ट पाहिले का? सात वाजेपर्यंत साहेब बरे होते…असं म्हणताना त्या कार्यकर्त्यांकडं प्रश्नार्थक नजरेने पाहतना दिसतो.
हा सीन संपतो तिथं प्रविण तरडेंचा आवाज पुन्हा ऐकाला येतो. ते म्हणतात, ‘काय चाल्लात? आनंद दिघेंची गोष्ट इथंच संपली नाही, पुन्हा भेटू लवकच’.
या शेवटच्या सीनमुळं धर्मवरी चित्रपटाचा पुढाचा भाग येणार का, येणार असेल तो केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.