शिर्डी : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी शिर्डीत मध्यान आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं साईबाबांना घातल्याची प्रतिक्रिया मटा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.

सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असताना मुरबाडचे आमदार कथोरे हे शिर्डीत साईंच्या दर्शनाला पोहोचले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी साई बाबांना साकडं घातलं. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मतदारसंघासाठी निधी मिळत नसल्याने शिवसेना आमदारांमध्ये खदखद होती. निधी मिळत नसल्याचे अनेक शिवसेना आमदारांनी मला बोलून दाखवले. मुख्यमंत्री त्यांचा असताना निधी मिळत नसेल तर सेना आमदारांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्या सर्व आमदारांना मनापासून शुभेच्छा असंही कथोरे म्हणाले.

अपक्ष आमदाराचा एकनाथ शिंदेंच्या गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले…
दरम्यान, ते पुढे म्हणाले की, ‘फक्त भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे सरकार होईल. भाजप ज्या दिवशी सत्ता स्थापन करेल त्यादिवशी आणखी आमदार जोडले जातील. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ताकदवान नेते आहेत. ४० पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बरोबर आहेत. मग शिवसेना राहिली कुठे? शिवसेनेत किती खदखद आहे हे आता स्पष्ट झालं आहे’, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

ही भाजपची खेळी…

‘ही भाजपची खेळी असण्याचा प्रश्नच नाही. राज्यसभा, विधानपरीषद निवडणुकीत त्यांची खदखद बाहेर पडली. हे सरकार पाडू असे फडणवीस कधीही म्हणाले नाही. त्यांच्या कर्माने हे सरकार पडेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि ते पडलंय, असे चित्र आहे.’ असंही किसन कथोरे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला अपक्ष आमदार, मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here