एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतल्यानं शिवसेनेसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

 

uddhav eknath shinde
मुख्यमंत्री ठाकरे आणि सेना नेते एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार एअरलिफ्ट
  • शिंदे आणि आमदार गुवाहाटीला पोहोचले
  • शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना, मविआ संकटात
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरू आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. उद्धव ठाकरेंकडे असणाऱ्या आमदारांची संख्या शिंदेच्या तुलनेत खूपच कमी आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाची कुणकुण काँग्रेस, राष्ट्रवादीला लागली होती. त्यांनी याची कल्पना मुख्यमंत्री ठाकरेंना दिली. यानंतर ठाकरेंनी शिंदेंना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं. दोन्ही नेत्यांमध्ये याच विषयी संवाद सुरू होता. तेव्हा उद्धवजी, मी कसं काय बंड करेन? तुम्ही इतकी मोठी गोष्ट कशी काय बोलता?, असे प्रश्न शिंदेंनी विचारले. त्यावेळी शिंदेंच्या डोळ्यात अश्रू होते. मी असं काही करूच शकत नाही. मी तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो, असं शिंदे पुढे म्हणाले. त्यानंतर ठाकरे भावुक झाले आणि त्यांनी विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी शिंदेंकडे सोपवली. एनबीटीशी बोलताना राजकीय विश्लेषक अशोक वानखेडेंनी हा घटनाक्रम सांगितला.
एकनाथ शिंदेंचा ७ पानांचा ठराव, त्यावर ३४ आमदारांच्या सह्या, शंभूराज देसाईंची पहिली सही!
शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आहेत. यातील एक-दोन आमदारांना जबरदस्तीनं नेलं जाऊ शकतं. पण इतक्या मोठ्या संख्येनं आमदारांना जबरदस्तीनं नेलं जाऊ शकत नाही, असं वानखेडे म्हणाले. आमदारांच्या नाराजीची सुरुवात राष्ट्रवादीकडे अर्थ आणि गृह मंत्रालय गेल्यापासूनच झाल्याचं वानखेडेंनी सांगितलं. शिवसेनेच्या अनेक आमदारांना निधी मिळत नव्हता. त्यामुळे ते खूप नाराज होते.
सुनील प्रभूंच्या पत्रानंतर शिंदेंनी प्रतोद बदलला, महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष न्यायालयात जाणार?
निधी मिळत नसल्याची तक्रार अनेक आमदार मुख्यमंत्री ठाकरेंकडे करायचे. त्यावर मी शरद पवारांशी बोलतो, असं उत्तर मुख्यमंत्री द्यायचे. मात्र त्यापुढे काहीच व्हायचं नाही. संपूर्ण सरकारच शरद पवार चालवणार असतील, तर मग आपण या सरकारमध्ये का आहोत, अशी भावना सेना आमदारांच्या मनात निर्माण झाली आणि हळूहळू ती अधिक प्रबळ होत गेली. त्याचीच परिणीती शिंदे यांच्या बंडात झाली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : how eknath shinde got chance to revolt against uddhav government inside
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here