मुंबई: राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या भावना जनतेसमोर ठेवल्या. उद्धव याचं फेसबुक लाइव्ह झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोस्ट आणि मेसेजचा पाऊस पडत आहे.
काय आहे मानेंची पोस्ट?
अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘कुल’ आहेत हे लय भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लय भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नको, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलं आहे. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला