Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे.

 

eknath shinde
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरुच
  • सोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा
  • ठाकरेंसमोर पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुहेरी संकट आहे. पक्ष आणि सरकार दोन्ही अडचण्यात आल्यानं ठाकरेंसमोर आव्हानात्मक स्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत पहिल्यांदाच मोठी फूट पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संकटामागे केंद्रीय तपास यंत्रणा असल्याचा आरोप केला आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमधील काहींची नावं पाहिल्यास यात तथ्य असल्याचं दिसून येतं.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा गट सध्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. शिंदेंसोबत असलेल्या आमदारांमध्ये प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधवदेखील आहेत. दोघेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडी आणि आयटीचे छापे पडले आहेत.
शिवसेना हा मूळ पक्ष आपल्या गटाकडे ठेवण्याचे एकनाथ शिंदेंचे प्रयत्न; आखली रणनीती
राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार, केंद्रीय तपास यंत्रणांपासून सुटका करून घेण्यासाठीच काही आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हिंदुत्त्वासोबत जाऊ, अशी मागणी आमदार करत आहेत. भाजपसोबत चला, असं या आमदारांना मुख्यमंत्र्यांना सुचवायचं आहे. भाजपच्या साथीनं सरकार स्थापन केल्यास तपास यंत्रणांपासून बचाव करता येईल, असा विश्वास या आमदारांना वाटतो. कारण तपास यंत्रणा काय करू शकतात, हे त्यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या रुपात पाहिलेलं आहे. हे दोन्ही आजी-माजी मंत्री गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

यामिनी-यशवंत जाधव

भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव आणि सलग चारवेळा मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घराववर काही महिन्यांपूर्वी आयकर विभागानं छापे टाकले. चार दिवस तपास चालला. अनेक महत्त्वाची कागदपत्रं अधिकाऱ्यांच्या हाती लागली. यामुळे येत्या काही दिवसांत जाधव यांच्या अडचणी वाढू शकतात. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी जाधव यांच्यावर केलेला आहे.
एकनाथ शिंदेंचे बंड तरीही शिवसैनिक शांत का?; जाणून घ्या
प्रताप सरनाईक
ओवळा-माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांची ईडीनं काही महिन्यांपूर्वीच चौकशी केली आहे. ईडीनं सरनाईक यांची संपत्ती जप्त केली. त्यांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीचे छापे पडले. विहंगला एकट्याला ताब्यात घेऊन ईडीनं चौकशीदेखील केली आहे. वर्षभरापूर्वी सरनाईक यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. पुन्हा मोदींसोबत जाऊ, अशी मागणी सरनाईक यांनी पत्रातून केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis sanjay raut said scared from cbi ed and income tax shiv sena mla with eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here