‘माध्यमांऐवजी समोर सांगितलं असतं तर हे गैरसमज दूर झाले असते. राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत पाठिंबा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. निधीबाबत कोणतात दुजाभाव केला नाही. निधीवरून माझ्यावर आरोप होत आहे. अडीच वर्षात निधीला कुठेच काटछाट केली नाही. असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षांची आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
‘आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करत म्हणाले.
‘मी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बोललो आहे, असं अजित पवार म्हणाले. आमची यापेक्षा कसलीही वेगळी भूमिका नाही, असं अजित पवार म्हणाले. शिवसेना नेते प्रवक्ते याविषयी सांगतील. सेनेचे कैलास पाटील, नितीन देशमुख असतील ते परत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना आवाहन केलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. आमचे सर्व आमदार आमच्या भूमिकेशी सहमत आहेत’, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.