आग्राः उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एका भाजीवाल्याला करोना झाल्याने अनेकांना धडकी भरली आहे. जवळपासच्या वस्तीत यामुळे एक प्रकारची दहशत पसरली आहे. माहिती मिळताच किमान २ हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आग्रातील फ्रिगंज भागातील चिम्मन लाल बाडा इथं हा प्रकार घडला आहे.
केजीएमयू हॉस्पिटलमधून आलेल्या चाचणीत २४ जण पॉझिटिव्ह आढळलेत. यात भाजीवाल्याचाही समावेश आहे. आता आरोग्य विभाग भाजीवाल्याच्या संपर्कात आलेल्यांचा तपास करत आहे. यानंतर संपूर्ण भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
लॉकडाऊनमध्ये भाजी विक्री
लॉकडाऊन असतानाही भाजी विक्री सुरू केली होती. यापूर्वी रिक्षा चालवण्याचं काम ते करत होते. पण कमाई होत नसल्याने फळं आणि भाजीपाला विक्री सुरू केली. मार्केटमधून ते भाजीपाला आणत होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे चाचणी करण्यासाठी ते स्वतःच जिल्हा रुग्णालयात गेले. तिथे त्यांना दाखल करण्यात आलं, अशी माहिती भाजीवाल्याच्या कुटुंबीयांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times