‘भाजपचा निवडणुका जिंकण्यावर नाही तर सरकार पाडण्यावर विश्वास’
लकी अली यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, ‘आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करत आहे. विषय संपला.’ आपल्या मनातलं लकी अली व्यक्त झालेत. या पोस्टमध्ये फुल स्टाॅप असं म्हणून त्यांनी यावर मला आणखी काही बोलायचं नाही, असं दर्शवलं आहे. या पोस्टला ३ हजाराहून जास्त लोकांनी लाइक्स केलेत. दोन तासात ३०० हून जास्त कमेंट्स आल्यात आणि पोस्ट शेअरही झाली आहे.

गेल्या वर्षी लकी अली मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मुंबई योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळीही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आदित्य ठाकरे मला कारपर्यंत सोडायला आले, त्यांनी कारचा दरवाजा उघडून दिला म्हणजे ज्येष्ठांबद्दल त्यांचा आदर दिसून येतो, असंही अली म्हणाले होते.
‘आमदार गुजरातमध्ये विकायला जातात, कारण तिथूनच बोली लावणारे येतात’
बॉलिवूड अभिनेता केआरकेनेही या प्रकरणावर ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं, ‘आज एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थकासह गुवाहाटीला पोहोचले आहेत. म्हणजे आता ते कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत परत येणार नाहीत. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडलं आहे. पण माझा प्रश्न आहे की आता नवीन सरकार कोणते आणि कसे बनवणार आणि नवीन सरकार किती स्थिर असेल?’
केआरकेनं तर भाजपवर टीकाही केली आहे. त्यानं म्हटलंय, भाजपचा सरकार पाडण्यात विश्वास आहे, सरकार बनवण्यावर नाही.