आदित्य ठाकरे यांनी पुढील काळात जास्तीत जास्त उमेदवारी महिलांना देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्या संपर्कात जे आमदार असतील त्यांना परत घेऊ, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

हायलाइट्स:
- शिवसेनेचा मेळावा
- शिवसैनिकांची मोठी गर्दी
- मेळाव्याला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी
सचिन अहिर तुम्ही परिवार एकत्र आणले होते. विधानपरषिदेची निवडणूक असताना मी ग्लासगोला होतो. त्यावेळी सचिन अहिर यांनी मला फोन करुन पहिली उमेदवारी सुनील शिंदे यांना देतो, त्यांनी माझ्यासाठी उमेदवारी सोडली. शिवसेनेनं राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांच्यासोबत कोल्हापूरचे सामान्य शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली. विधानपरिषदेत सचिन अहिर यांच्यासह आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली. सामान्य शिवसैनिक विधानभवनात पाठवला, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
‘शिवसेनेत हिंदुत्त्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी?’ मंत्री संदिपान भुमरेंचा सवाल
मुख्यमंत्री वर्षातून फेसबुक लाइव्ह करत असताना टीम आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्हपूर्वी आम्हाला बॅगा बांधायला सांगितलं. वर्षा बंगल्याचा आपल्याला मोह नाही, यापूर्वी काही जणांनी पुन्हा येईन, पुन्हा येईन असं लिहिलं होतं. काही जण बंगले पण सोडत नाहीत. आदित्य ठाकरे यांनी दिलीप लांडे आणि प्रकाश सुर्वे यांच्यावर टीका केली. आपल्याला हे दु:ख मित्रपक्षांनी दिलेलं नाही, आपल्याच माणसांनी दिल. संदिपान भुमरे यांच्या सारख्या आपली प्रेमाची माणसं समोरुन विरोधात बोलू लागली. मी कोणत्या तोंडानं तरुणांना राजकारणात येऊ सांगू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांचं मंत्रिपद धोक्यात, २४ तासात कारवाई होणार?
महाराष्ट्रातील जे लोक राजकारण कळतं पण राजकीय नाहीत त्यांनी मेसेज पाठवले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विश्वासदर्शक ठराव होणार आहेत. मुंबईत ज्यावेळी येतील त्यावेळी विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते वरळीतून आहे, वरळीतून नाही तर परळ मधून रस्ते आहेत. भायखळ्यातून रस्ता आहे. ही मुंबई हा महाराष्ट्र आपल्याला दुसऱ्याच्या हातात जाऊ द्यायचं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्र सरकार फ्लोअर टेस्टला आर्मी लावेल, पॅरामिलिटरी फोर्स लावेल, केंद्र सरकारला जगाला, देशाला आणि राज्याला उत्तर द्यावं लागेल,असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिंदे रात्री गुवाहाटीहून निघाले, मध्यरात्री बडोद्यात फडणवीसांशी भेट, शाहांचीही उपस्थिती?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री जे खातं इतरांना देत नाहीत ते नगरविकास खातं त्यांना दिलं. मध्यरात्री सूरतला पळून गेले. तिथून गुवाहाटीला गेले, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network