‘बंडखोरांनी मुंबईत येऊन दाखवावं’
‘गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेल हे बिग बॉसचं घर वाटत आहे. बंडखोरी केलेले निम्मे आमदार अपात्र ठरणार आहेत. या आमदारांना आज ना उद्या मुंबईत यावंच लागणार आहे. जे ४० जण तिथे आहेत ते प्रेतं आहेत. जेव्हा ते इथे परत येतील तेव्हा फक्त त्यांचं शरीर येईल त्यांचा आत्मा मेलेला असेल. त्यांना माहिती आहे की जेव्हा ते इथे येतील तेव्हा इथे जी आग लागली आहे त्यात काय होईल. बंडखोरांनी मुंबईत येऊन दाखवावं आणि प्रकाश सुर्वेने तर येऊनच दाखवावं, हे माझं आव्हान आहे,’ असा आक्रमक इशार संजय राऊत यांनी दिला आहे.
‘हे बाहेरुन येतात आणि आम्हाला शिवसेना काय आहे ते शिकवतात. अब्दुल सत्तार आणि हिंदुत्वाचा काय संबंध? महाराष्ट्र आणि ठाकरे कुटुंबाविरोधात मोठं कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्र त्यांना तीन भागात तोडायचा आहे. याला शिवसेना विरोध करेल, म्हणून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.