हे प्रकरण बिहारमधील किशनगंज आणि पूर्णियाशी संबंधित असून पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. शमशादने आपण बॅचलर असं सांगून अनेक लग्न केले आणि आता तो पुन्हा नवीन लग्न करण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याता हा प्लॅन फसला यावेळी तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली, तेव्हा उपस्थित असलेले सर्व त्याचा हा कारनामा ऐकून थक्क झाले. विशेष गोष्ट म्हणजे एकाही पत्नीला त्याच्या दुसऱ्या पत्नीविषयीची माहिती नव्हती.
यानंतरही या नराधमाची वासना शमली नाही आणि यावेळी त्याने लग्नाच्या उद्देशाने एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं. अपहरण केलेल्या मुलीच्या वडिलांनी पूर्णिया जिल्ह्यातील अंगढ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात केली आणि तपासााल सुरूवात करण्यात आली. तपासादरम्यान, हा आरोपी कोचाधामण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनारकली येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी, किशनगंज पोलिसांची मदत घेण्यात आली आणि अखेर त्याला बहादूरगंज पोलीस स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली.
आरोपीने पोलिसांसमोर खुलासा केला की, तो लग्नानंतर पत्नीला घेऊन यूपीला जात असे. एसडीपीओ अन्वर जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाद हा मुलींना सहजपणे आपल्या जाळ्यात अडकवायचा. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात आडकवायचा, लग्न करायचा आणि शेवटी सेक्स डीलसाठी यूपीत जाऊन त्यांना विकायचा. अशाप्रकारे प्रत्येक पत्नीचा सौदा करून तो वेगवेगळ्या भागात जाऊन नवीन पत्नी शोधत असे.
दरम्यान, सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनेक निरपराधाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. मात्र, त्याच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.