मनमाड : नदीतून वाहणारं पाणी अचानक लाल रंगाचं झालं तर? ही कल्पनाही आपल्याला विचारात पाडते. पण महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे जिथे थेट नदीपात्रात रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याचं समोर येत आहे. मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीच्या सांडव्या पुलावरून रक्तमिश्रित पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील पूर्व भागात असलेल्या काही कत्तलखान्यातून रक्तमिश्रित पाणी नेहमी ड्रेनेजव्दारे मोसम नदीपत्रात सोडलं जातं. पावसाळा सुरू झाला असून बऱ्याच ठिकाणी नाले – ड्रेनेज यांची सफाई न झाल्याने ते चोकअप होऊन हे पाणी थेट सरदार चौकातून खाली येत मोसम नदीच्या सांडवा पूलावर आल्याने येथील व्यवसायिकांची चांगलीच अडचण झाली आहे.

एकनाथ शिंदे तळ ठोकून असलेल्या गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय
रक्तमिश्रित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने या परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली. मनपा प्रशासनाला वारंवार या विषयी तक्रारी करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मनपा त्वरित याकडे लक्ष देऊन संबंधित कत्तलखाना चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Sanjay Raut: तुमचा भाऊ एकनाथ शिंदेंच्या गोटात जाणार होता का? संजय राऊत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here