मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या राजकीय जीवनातील सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत. स्वत:च्या पक्षाच्या आमदारांनीच सरकारविरोधात बंड करत पाठिंबा काढण्याची भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेनेच्या ३८ आमदारांनी आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत, असं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र अशा स्थितीतही हे सरकार वाचवण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्णयातून दिले आहेत.

शिवसेनेतून बंड केलेल्या ९ मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आता शिवसेनेसोबत असलेल्या अन्य मंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ‘जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसंच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवत आहोत,’ असं उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेताना म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडे नेमका कोणता अधिकार असतो?

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६-अ मध्ये ६-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांना आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येतील. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येईल, अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचं खातं कोणाकडे?

बंडखोर आमदारांसह गुवाहाटी येथे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

ठाकरे सरकार अल्पमतात, राऊतांविरोधात तक्रार, झिरवळांवर आक्षेप, भाईंच्या याचिकेतील ३ मोठे मुद्दे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल:

शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here